बुधवार, फेब्रुवारी 5, 2025
Homeबातम्याकल्याण-डोंबिवलीतील २७ गावांना धो-धो पाणी मिळणार

कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांना धो-धो पाणी मिळणार

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी दिलासादायक बातमी: पाणीपुरवठा योजनेस मान्यता

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमृत योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवली शहरासाठी ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या योजनेमुळे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या योजनेबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून, नागरिकांनी त्यांच्या वचनपूर्तीचे स्वागत केले आहे. या योजनेमुळे नव्याने समाविष्ट गावांमध्ये पाण्याची टंचाई दूर होऊन १०५ दलघमी साठवण क्षमतेसह प्रभावी पाणीपुरवठा व्यवस्था उभारली जाणार आहे.

सध्या अमृत योजनेच्या अंतर्गत पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन, आणि हरित क्षेत्र विकास यांसारख्या सुविधांवर काम सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केलेल्या सुधारित तांत्रिक प्रस्तावाला राज्यस्तरीय तांत्रिक समिती व उच्चाधिकार सुकाणू समितीने मंजुरी दिली आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण करत या प्रकल्पासाठी मान्यता मिळवली आहे. नागरिकांमध्ये या निर्णयाबद्दल समाधानाची भावना असून, पाणीपुरवठा समस्यांवर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कल्याण-डोंबिवली शहराच्या विकासाला गती देणाऱ्या या प्रकल्पामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवला जाईल, तसेच भविष्यातील वाढत्या मागणीची पूर्तता होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments